Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

धनपुर,चिरडा,दरा प्रकल्प क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

 नंदुरबार दि २३ (प्रतिनिधी) तळोदा तालुक्यातील धनपुर लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. असून सद्यास्थितीत पाणी पातळी 114.50 मी. ची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रकल्पात 100 टक्के क्षमतेने पाणी साठा झाला असुन प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्यामुळे निझऱ्या नाला काठावरील गावे मोठा धनपुर, छोटा धनपुर, सावरपाडा, मोड व इतर गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे तळोदा तालुक्यातील धनपुर ,शहादा तालुक्यातील लघु पाटपंधारे प्रकल्प चिरडा, व मध्यम प्रकल्प दरा या लघु प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी, नाले व धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे कार्यकारी अधिकारी हरिष भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
        नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक, नंदुरबार विभागांतर्गत असलेल्या शहादा प्रकल्पांतर्गत लघु पाटबंधारे योजना चिरडा, या प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सद्यास्थितीत पाणी पातळीत 121.00 मी. ची नोंद झाली आहे. या प्रकल्पात 100 टक्के क्षमतेने पाणी साठा झाल्याने प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू आहे. त्यामुळे उमरी नाला काठावरील चिरडा, पिंप्राणे, तलावडी, मडकाणी, आमोदा, फत्तेपुर व इतर गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
       तसेच शहादा तालुक्यातील दरा प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यास्थितीत पाणी पातळी 309.20 मी. ची नोंद झाली आहे. प्रकल्पात 100 टक्के क्षमतेने पाणीसाठा झाला असून प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग चालू झाला आहे. त्यामुळे वाकी नदी काठावरील विरपुर, रामपुर, फत्तेपुर, शिरुड त. हवेली, कानडी त. हवेली, चिखली, औरंगपुरा, कोठली त. हवेली, परिवर्धा, वैजाली, नांदर्डे व इतर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.या क्षेत्रातील नदी व नाला पात्रामध्ये गुरढोरे सोडण्यात येऊ नये व कोणत्याही मनुष्याने पात्रात जावू नये तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे यांनी या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.